देश विकासासाठी, समाज उद्धारासाठी, कायदा - शेती - जल - अर्थ - समाज - संस्कृती - उद्योग - कामगार आणि शिक्षण क्षेत्रातील कार्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर आजही आपल्या सोबत जिवंत आहेत !
सांगावा न्युज, पुणे. दि. ६ डिसेंबर २०२४ : भारतीय समाज व्यवस्थेतील उच नीचतेच्या थराला सुरुंग लावून चातुरवर्ण व्यवस्था उद्ध्वस्त करून सर्व धर्मीय समाजाला समान न्याय व ते हक्क मिळवून देणारे एकमेव अद्वितीय महापुरुष म्हणजे डॉ. बाबसाहेब आंबेडकर. आज ६ डिसेंबर बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन. सांगावा न्युज परिवारातर्फे मनपूर्वक श्रद्धांजली व्यक्त करून महामानवाला विनम्र अभिवादन.
आपल्या दैनंदिन जीवनात वावरत असताना महापुरुषांच्या कार्याची आठवण पाउलो पावली येत असतेच. देश विकासासाठी, समाज उद्धारासाठी, कायदा - शेती - जल - अर्थ - समाज - संस्कृती - उद्योग - कामगार आणि शिक्षण क्षेत्रातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या भरीव कामगिरीचा इतिहास पुस्तकांच्या पानांवर वर्तमानात आपण वाचतो आहोत. पुस्तकातून, स्मारकातून, अडचणीच्या वेळी कायद्याची मदत म्हणून, शैक्षणिक पठ्यक्रमातून आणि तुमच्या आमच्या मनातून आपण सतत बाबासाहेबांसोबत संवाद साधत असतो. म्हणून म्हणावसं वाटतं की शुर महापराक्रमी महामानवांचा कधी अंत होत नसतो ना कधी मृत्यू. त्यांचा महापरिनिर्वाण होतो म्हणजे ते आपल्याला आणि जगाला सोडून गेले का तर असेही नाही. ते सतत आपल्यात वावरत असतात. वेळोवेळी बोलत असतात. योग्य त्या ठिकाणी त्यांचे दर्शन होत असते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण झाला तो दिवस म्हणजे ६ डिसेंबर १९५६ : पण, आजही सर्वांच्या न्याय हक्कांसाठी निर्भिडपणे उभा असलेला एकमेव भारतीय ' अमर ' व्यक्तिमत्त्व म्हणजे भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या महामानवाला विनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा