गुरुवार, २ एप्रिल, २०२६
प.पूज्य श्री भालचंद्र महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने मिळालेल्या आयुष्य लोक कल्याणासाठी अर्पण केले___ सिध्दयोगी गुरुवर्य सद्गुरुनाथ श्री माऊली महाराज वाळुंजकर
बुधवार, १ एप्रिल, २०२६
अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई; ग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ८८.८७ चौरस मीटर क्षेत्रफळावरील बांधकामांचे निष्कासन
आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी पिंपरी चिंचवडकरांची जाहीर माफी मागावी__मारुती भापकर (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते)
औंधमध्ये माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा १२ एप्रिलला
मंगळवार, ३१ मार्च, २०२६
महिला व लोणावळा शहर पत्रकार संघ आयोजित महिलादिनानिमित्त महिला पत्रकार व रणरागिणीचा सन्मान संपन्न
दैनिक महिला संवादचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड , दिनांक ३१ मार्च : दैनिक महिला संवादचा प्रथम वर्धापन दिन दिनांक २९ मार्च रोजी आरंभ बँक्वेट हॉल येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. नगरसेविका अर्चना तापकीर, ॲड. स्नेहा कांबळे, कार्यकारी संपादक विद्या जाधव व उपसंपादक सुनंदा निक्रड यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री ज्ञानेश भुकेले यांच्या मार्गदर्शनाखाली श्री कैलास थोपटे यांच्या हस्ते महिला संवाद न्यूज पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमास ॲड. वंदना गायकवाड, नगमा शेख, उमा बगाडे, माधुरी शहापूरे, किरण साळवे, दीपाली सौदागर,मनिषा असादे, दिपिका सावंत, रत्नमाला देवमाने, चंद्रकला चव्हाण, अनिता लोहार, दिशा कदम, सोनाली कांबळे, आशा मुळीक, श्री अप्पासाहेब माने, प्रा. संजीव सूर्यवंशी, भागचंद चव्हाण, नरेश असादे, महेश सोनटक्के,प्रशांत थोरात,संजय गायके तसेच संस्कार प्रतिष्ठानची टीम उपस्थित होती. ज्येष्ठ पत्रकार विकास साळवे यांनीही उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर सूर्यवंशी, डिजिटल मिडिया परिषद शहराध्यक्ष विनय सोनवणे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद उपाध्यक्ष गणेश मोकाशे, महावीर जाधव, माऊली भोसले, रमेश साठे, संजीव सूर्यवंशी, सिद्धांत चौधरी, हनुमंत रामदासी, नरेश जीवनाल
सोमवार, ३० मार्च, २०२६
पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान
जागतिक महिला दिन साजरा करून पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या रणरागिणींचा सन्मान
विविध क्षेत्रातील रणरागिणींचा पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने केला सन्मान
जागतिक महिला दिनानिमित्त पत्रकारांकडून रणरागिणींचा गौरव
| सांगावा न्यूज| पिंपरी चिंचवड, दिनांक २९ मार्च २०२६ : जागतिक महिला दिन हा आठ मार्च रोजी जगभर साजरा केला जातो. तसेच मार्च महिन्यात वेगवगेळ्या तारखांना देखील साजरा केला जातो. पिंपरी चिंचवड शहरातील सायन्स पार्क येथे दिनांक २९ मार्च रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्वोत्कृष्ट रणरागिणींचा सन्मान करण्यात आला. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई, संलग्न असलेल्या पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मिडिया परिषद पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड पत्रकार संचाचे अध्यक्ष सागर गोपाळ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात झालेल्या या कार्यक्रमाला मान्यवरांसह शेकडो नागरिक उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रविभाऊ लांडगे आणि उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. समाजातील महिलांचे योगदान अधोरेखित करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडल्याच्या भावना यावेळी डिजिटल मिडिया परिषदेचे शहराध्यक्ष विनय सोनवणे यांनी व्यक्त केल्या.
विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या या सोहळ्यांमध्ये राजमाता जिजाऊ पुरस्कार - डॉ. किशोरी आपटे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार - सुप्रिया सचिन मंडलिक, त्यागमूर्ती माता रमाई पुरस्कार - सुभद्रा आत्माराम मोकाशे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार - स्वरांजली माने, पशुवैद्यकीय सेवारत्न पुरस्कार - डॉ. पूजा बोंबले, पिंपरी चिंचवड संस्कारत्न पुरस्कार - भारतीय न्यायाधीश, पिंपरी चिंचवड कलारत्न - ज्योती भीमाशंकर सेतसंदी, पिंपरी चिंचवड सिनेरत्न पुरस्कार - कृत्तिका तुळसकर, आणि रुग्णसेवा विशेष सन्मान स्वाती कुलकर्णी, शोभा तळेकर, शोभा ढोले यांना प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एकूण १४ महिला बचत गटांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पद्मजा, मैत्री अपंग, समृद्धी, आई, श्रीकृष्ण, साई चरण, सुनिधी, आनंदी, साई, जीवन ज्योती, जास्वंदी, विघ्नहर्ता, रोहिणी आणि यशोदा महिला बचत गटांचा सन्मानचिन्ह व वृक्ष रोप देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रमिला सुनील आढाव (महिंद्र स्पेअर बिझनेस युनीट, कान्हे हेड ऑफ दी डिपार्टमेंट - डेटा एन्ट्री विभाग) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
महिलांच्या सन्मानार्थ कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे आभार मानून - वाचन, अभ्यास, संशोधन ज्ञान, विज्ञान, आरोग्य, महिला सक्षमीकरण यासाठी पिंपरी चिंचवड शहरामध्ये नवीन इन्फ्रास्ट्रक्टर उभे केले जाणार असून या नवनिर्मितीत पुरुषांप्रमाणेच महिलांना संधी उपलब्ध करून देणार असल्याच्या भावना महापौर रविभाऊ लांडगे यांनी व्यक्त केल्या. तर आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहून कर्तृत्ववान रणरागिणींचा सन्मान करता आला आणि महिलांसोबत विचारांची देवाणघेवाण करता आल्याचे, उप महापौर शर्मिलाताई बाबर यांनी समाधान व्यक्त केले. तर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद समाज हितासाठी, पत्रकारांच्या हितासाठी कार्य करीत असताना परिषेदेशी संलग्न असलेल्या पिंपरी चिंचवड पत्रकार संघाने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याची परंपरा कायम ठेवत महिला भगिनींचा केलेला सन्मान इतरांना प्रेरणादायी ठरत असल्याची भावना पत्रकार परिषेद विश्वस्त शरद पाबळे यांनी व्यक्त केली.
या सोहळ्यात शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्य, उद्योग, कला, क्रीडा, विज्ञान, वैद्यकीय आदी क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानचिन्ह, शाल व झाडाचे रोप देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना त्यांना अधिक सक्षम बनविण्यासाठी समाजाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार , सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन्मानित महिलांनीही आपल्या यशामागील संघर्ष व अनुभव शेअर करत इतर महिलांना प्रेरणा दिली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड शहराचे महापौर रविभाऊ लांडगे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, मार्गदर्शक उपस्थिती अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषेद विश्वस्त शरद पाबळे, परिषेद उपाध्यक्ष गणेश मोकाशे, पुणे जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर मंचावर उपस्थित होते. तर परिषद जिल्हा पदाधिकारी चिराग फुलसुंदर, अनिल वडघुले, श्रीमती रेखा भेगडे, मारुती बानेवार, श्रीमती प्रज्ञा आबनावे, याच बरोबर पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे व डिजिटल मिडियाचे शिलेदार डिजिटल मिडिया शहर उपाध्यक्ष संतोष गोतावळे, महावीर जाधव, अशोक कोकणे, रमेश साठे, अनंता इंगळे, अविनाश कांबीकर, डॉ. देवीदास शेलार, पराग डिंगणकर, संजीव सूर्यवंशी, माऊली भोसले, सिद्धांत चौधरी, हनुमंत रामदासी, राकेश पगारे, जेष्ठ परिषेद सदस्य प्रकाश जमाले, किशोरअण्णा लष्करे, नरेश जीनवाला, श्रीमती अनुष्काताई, विजय न्यायाधीश, राहुल जाधव, इत्यादी पत्रकार उपस्थित होते. तसेच सन्मानार्थी निवड समितीमध्ये लिटिल सायंटिस्ट चे दत्तात्रय गिरमकर, निलेश बोराडे, आणि काव्य मित्रचे राजेंद्र सगर उपस्थित होते. दरम्यान या सन्मान सोहळ्यामध्ये काव्य मैफिल संपन्न झाली. कवी प्रकाश गायकवाड, कवी देवेंद्र गावंडे, प्राध्यापिका कवयित्री सुषमा भालेराव यांनी उपस्थितांची मने जिंकणाऱ्या कविता सादर केल्या. काव्य संचालन राजेंद्र सगर यांनी केले. तर विजय चव्हाण व स्वाती चव्हाण यांनी मान्यवरांना कला कुसर दाखवत वैविध्यपूर्ण फेटे परिधान केले.
जागतिक महिला दिनानिमित्त योजित कर्तृत्ववान रणरागिणींच्या या उपक्रमामुळे समाजात महिलांच्या योगदानाची जाणीव अधिक दृढ होऊन महिलांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर गोपाळ सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिजिटल मिडिया परिषद शहराध्यक्ष विनय सोनवणे यांनी केले तर आभार परिषेद सदस्य अनिल वडघुले यांनी मानले.
गुरुवार, २६ मार्च, २०२६
जागतिक वन दिन व जागतिक जल दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वृक्षारोपण
| सांगावा न्यूज | पुणे, दिनांक २६ मार्च २०२६ : जागतिक वन दिवस आणि जागतिक जल दिनाचे औचित्य साधून, जागतिक स्तरावर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील राजश्री शाहू गार्डन, चिंचवड,पुणे या ठिकाणी पर्यावरण संरक्षणसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या आणि मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या वडाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
दरवर्षी २१ मार्च रोजी जागतिक वन दिन जगभरात साजरा केला जातो, ज्याचा मुख्य उद्देश सर्व प्रकारच्या वनांचे महत्त्व अधोरेखित करणे आणि त्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करणे असून, संयुक्त राष्ट्र महासभेने २०१२ मध्ये या दिनाची घोषणा केली. हा दिवस हवामान बदल रोखण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यासाठी प्रेरित करतो. वने हे पृथ्वीचे "फुफ्फुस" मानले जातात, कारण ती कार्बन डायऑक्साइड शोषून हवा शुद्ध ठेवतात आणि जैवविविधतेला आधार देतात. तसेच २२ मार्च हा दिवस जगभरात जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो, ज्याचा मुख्य उद्देश पाण्याचे संवर्धन, संरक्षण आणि शाश्वत वापरासाठी लोकांमध्ये जागृती करणे. सुरक्षित पिण्याच्या पाण्याच्या महत्त्वाबद्दल लोकांना जागरूक करणे हा आहे. या दोन्ही दिनाचे औचित्य साधून,जागतिक स्तरावर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या राजश्री शाहू गार्डन,चिंचवड,पुणे या ठिकाणी पर्यावरण संरक्षणसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या आणि मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या वडाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी शाहू गार्डन चे रक्षक गार्ड श्री.सलीम शेख,श्री.अजित सांगोलकर आणि अभिषेक गवळी यांना राष्ट्रीय वृक्ष मित्र पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.देवा तांबे,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सचिन नरुटे, महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा सौ.धनश्री नरुटे,महाराष्ट्र राज्य महिला निरीक्षक सौ.स्नेहा तांबे,महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष सौरभ हजारे, तसेच संस्थेचे पुणे जिल्हा पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवडच्या पाणीटंचाईवर आमदार अमित गोरखे आक्रमक : ३० एम.एल.टी. वाढीव पाण्याची आणि जॅकवेल प्रकल्पाची सभागृहात मागणी
विधान परिषदेत ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे वेधले लक्ष
| सांगावा न्यूज | पिंपरी-चिंचवड, दिनांक २५ मार्च २०२६ : पिंपरी-चिंचवड शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्या तुलनेत अपुरा पडणारा पाणीपुरवठा या गंभीर विषयावर आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत आवाज उठवला आहे. शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी अतिरिक्त ३० एम.एल.टी. पाणीसाठा मंजूर करावा आणि आंध्र धरण प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून सभागृहात केली.
यावेळी बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले की, "पिंपरी-चिंचवड हे राज्याचे महत्त्वाचे औद्योगिक आणि निवासी केंद्र आहे. मात्र, सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा वाढत्या लोकसंख्येसाठी अपुरा पडत आहे. यामुळे नागरिकांना नियमित आणि पुरेशा दाबाने पाणी मिळण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे"
* प्रमुख मागण्या *
# ३० एम.एल.टी. अतिरिक्त पाणीसाठा : पुणे महानगरपालिकेकडे सध्या वर्ग होत असलेला ३० एम.एल.टी. पाणीसाठा पिंपरी-चिंचवड शहरासाठी मंजूर करण्यात यावा, जेणेकरून नागरिकांची तात्पुरती गरज भागेल.
# जॅकवेल प्रकल्पासाठी जागा : आंध्र धरण परिसरात सिंचन विभागाची सुमारे अडीच एकर जागा उपलब्ध झाल्यास, त्या ठिकाणी जॅकवेल प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करता येईल.
# दीर्घकालीन उपाययोजना : जॅकवेल प्रकल्प पूर्ण झाल्यास शहरासाठी दीर्घकालीन आणि मुबलक पाणीसाठा उपलब्ध होऊ शकेल, ज्यामुळे भविष्यातील पाण्याची चिंता मिटेल.
या विषयाचे गांभीर्य सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. संबंधित विभागाने यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती केली आहे. शहराच्या मूलभूत गरजांसाठी आपण सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही आमदार अमित गोरखे यांनी यावेळी स्पष्ट केले.
बुधवार, २५ मार्च, २०२६
अखेर बारामती विमान दुर्घटनेत गुन्हा दाखल रोहित पवारांच्या लढ्याला कर्नाटकातून यश
| सांगावा न्यूज | पुणे, दिनांक २५ : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार याच्या लढ्याला अखेर यश आलं असून बारामतीमधील अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी अखेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बारामती विमानतळाजवळ झालेल्या लियरजेट 45 विमान दुर्घटनेप्रकरणी कर्नाटकाच्या बंगळुरू येथील शेशाद्रीपुरम पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. या दुर्घटनेमागे मोठा गुन्हेगारी कट असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आजच रोहित पवार यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. नागपुरात बस स्टॉपवरुन चार्जर चोरीला गेली म्हणून गुन्हा दाखल झाला, चप्पल चोरीला गेली म्हणून गुन्हा दाखल झाला. अंगणात झाडाच्या फांद्या आल्या म्हणून गुन्हा दाखल झाला, मात्र अजित दादांच्या संदर्भात गुन्हा दाखल झाला नाही, ज्याचं जळतं त्यालाच कळतं, असेही रोहित पवार यांनी म्हटले होते.
अजित पवार प्रवास करत असेले मुंबईहून बारामतीकडे येणारे VT-SSK नोंदणी असलेले बॉम्बार्डियर लियरजेट ४५ विमान २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.४३ ते ८.४५ वाजण्याच्या सुमारास कोसळले. हे विमान VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे चालवले जात होते. या दुर्घटनेत विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये त्या वेळचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचाही समावेश होता. या प्रकरणी मृत अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १७३(१) अंतर्गत ‘झिरो FIR’ म्हणून तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी त्यांनी २५ फेब्रुवारी रोजी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे तसेच २६ फेब्रुवारी रोजी बारामती पोलीस ठाण्यात संपर्क साधला होता. मात्र, FIR नोंदवण्यात आला नव्हता. त्यानंतर पुणे सीआयडीकडून केवळ अपघाती मृत्यू अहवालाच्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले होते.रोहित पवार यांच्या तक्रारीनुसार, ही दुर्घटना केवळ अपघात नसून उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य करणाऱ्या मोठ्या गुन्हेगारी कटाचा भाग असू शकतो. तक्रारीत विमान सुरक्षेच्या नियमांचे पद्धतशीर उल्लंघन, नोंदींची बनावट कागदपत्रे तयार करणे, देखभाल आणि ऑपरेशनमध्ये गंभीर निष्काळजीपणा अशा अनेक बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. २४ फेब्रुवारी रोजी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सादर केलेल्या सुरक्षा लेखापरीक्षण अहवालात कंपनीची काही विमाने निष्काळजीपणामुळे उड्डाणासाठी अयोग्य असल्याचे नमूद करण्यात आले असून, ती विमाने ग्राउंड करण्यात आल्याचेही सांगितले आहे. तसेच, दुर्घटनाग्रस्त विमानाने सुमारे ४९१५ उड्डाण तास पूर्ण केले होते, जे ५००० तासांच्या अनिवार्य इंजिन ‘टाइम बिफोर ओव्हरहॉल’ मर्यादेच्या अत्यंत जवळ होते. तरीही कंपनीने व्यावसायिक वापरासाठी विमान चालू ठेवले होते, ज्यामुळे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला, असे तक्रारीत म्हटले आहे.












