Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, २ एप्रिल, २०२६

प.पूज्य श्री भालचंद्र महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने मिळालेल्या आयुष्य लोक कल्याणासाठी अर्पण केले___ सिध्दयोगी गुरुवर्य सद्गुरुनाथ श्री माऊली महाराज वाळुंजकर


| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २ मार्च : सिध्द योगी गुरुवर्य सदगुरुनाथ श्री. माऊली महाराज वाळुंजकर यांचा १०१ वा अभिष्टचिंतन सोहळा नवमहाराष्ट्र विद्यालय मैदान, पिंपरी गाव येथे सर्व भक्तजन आणि शिष्य परिवार यांनी १ एप्रिल २०२६ रोजी साजरा करण्यात आला. यावेळी परमपूज्य सद्गुरुनाथ श्री माऊली महाराज वाळुंजकर यांनी, प.पू.परमहंस श्री भालचंद्र महाराज यांच्या आशीर्वादाने मिळालेले आयुष्य लोक कल्याणासाठी अर्पण केले. त्यामुळे आत्मिक समाधान प्राप्त झाले, असे उद्गार काढले. 

यावेळी ह.भ.प.बाळकृष्ण महाराज वसंत गडकर यांचे सुश्राव्य असे कीर्तन झाले. कीर्तनरुपी सेवेसाठी 'बाबा अहंकार निशी घनदाट | गुरु वचनी फुटली पहाट | 'माना भक्ति भेटली बरंवंट | तिने मार्ग दाखविला चौकट गा || हा अभंग निवडला. यावेळी, आजकालच्या बुवाबाबांमुळे सगळं परमार्थिक वातावरण दूषित झाले आहे प्रत्येक भक्ताला कळकळीची विनंती की, ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवीला महत्त्व देऊन 'जाणतेने गुरु भजनीचा' तेणे कडूजार होईल' कुठल्याही भक्तांनी बुवाबाजीला, भपकेगिरीला बळी न पडता तो आत्मज्ञानी आहे का? तो राजीयोगी आहे का? तो आत्मस्वरूपाशी एकनिष्ठ आहे का? तो ब्रह्मानंदात विलीन आहे का? ही परीक्षा घेऊनच मग त्याला शरण जावे असा समाजाला उपदेश केला.

सलग २ दिवस रक्तदान शिबिर घेऊन जवळजवळ १५० लोकांनी रक्तदान केले. होम हवन करून गुरुवर्य जय बाबांची फळांनी तुला करण्यात आली. ह.भ.प.पूनमताई नळकांडे यांचा अभंगवाणीचा कार्यक्रम झाला. गुरुवर्य जय बाबांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ५००० पेक्षा जास्त भक्तांना अन्नप्रसाद देण्यात आला. माजी महापौर संजय वाघेरे, मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी विरोधी पक्ष नेते दत्तात्रय वाघेरे, मा. चेअरमन पीसीएमटी संतोष कुदळे, नगरसेविक रंगनाथ कुदळे, नगरसेविका प्रियंका कुदळे, मा. सभापती शिक्षण मंडळ श्रीरंग शिंदे, मा. नगरसेविका मीनाताई नानेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी जय बाबा भक्तगण व परिवार तसेच पिंपरी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. त्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दत्तात्रय तरटे, श्री. अभिजित वाघेरे व सौ. वैष्णवी राऊत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परमपूज्य श्री भालचंद्र महाराज आश्रम कणकवली. श्री सोहम सिद्ध दत्त व भालचंद्र महाराज आश्रम वाघोली. श्री क्षेत्र वडजाई, श्री क्षेत्र ढोमखेल, श्री लोहगाव श्री क्षेत्र अष्टापुर, श्री क्षेत्र केंदूर भक्तगण व शिष्य परिवार यांनी केले.

बुधवार, १ एप्रिल, २०२६

अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई; ग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ८८.८७ चौरस मीटर क्षेत्रफळावरील बांधकामांचे निष्कासन


| सांगावा न्यूज | पिंपरी, दि. १ एप्रिल २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्र. २७ मधील वृंदावन कॉलनी, रहाटणी तसेच तापकीर मळा चौक, तापकीर नगर, रहाटणी या परिसरांमध्ये आज अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान एकूण अंदाजे ८८.८७ चौरस मीटर क्षेत्रफळावरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली.
महापालिका प्रशासनाने शहरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी कठोर भूमिका घेतली असून, त्या अनुषंगाने ही कारवाई राबविण्यात आली. सदर कारवाई आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली तर ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे यांच्या अधिपत्याखाली राबविण्यात आली.
कारवाईदरम्यान उप अभियंता जयवंत रोकडे यांच्या समन्वयातून महापालिका धडक कारवाई पथकाने सक्रिय सहभाग नोंदविला. यामध्ये बीट निरीक्षक किरण पवार, विनोद बजबळकर, दिग्विजय घोटकुले व ज्ञानराज खंडाळे यांचा समावेश होता.
या मोहिमेसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीची योग्य ती उपलब्धता करण्यात आली होती. कारवाईदरम्यान एम.एस.एफ.चे १२ जवान, १ पोलिस कर्मचारी, महापालिकेचे ५ मजूर तसेच ठेकेदारामार्फत ४ मजूर उपस्थित होते. याशिवाय जेसीबी ब्रेकर १, ट्रॅक्टर ब्रेकर १ तसेच ४ हातोड्यांच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामांचे निष्कासन करण्यात आले.
महापालिका प्रशासनाकडून शहरातील अनधिकृत बांधकामांविरुद्ध अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, नागरिकांनी बांधकाम करताना नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी पिंपरी चिंचवडकरांची जाहीर माफी मागावी__मारुती भापकर (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते)


आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी पिंपरी चिंचवडकरांची 
जाहीर माफी मागावी__मारुती भापकर (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते)

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १ मार्च : गंधर्व महाविद्यालय आणि संतपीठ व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या आगामी आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेच्या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी चुकीचे विधान केले आणि वादाच्या भोवऱ्यात अडकले. "पिंपरी चिंचवड शहराची जगात काय ओळख?" अर्थात पिंपरी चिंचवड शहराला जागतिक पातळीवर कोण ओळखत? असे विधान आयुक्त साहेबांनी केल्यामुळे पिंपरी चिंचवड मधील रहिवाशांच्या भावना दुखावल्या. स्थानिक पत्रकारांच्या भावना दुखावल्या. नेते पुढारी मंडळींनी देखील आयुक्तांच्या या बेजबाबदार वक्तव्याचा जाहीर निषेध केला. या परिस्थितीत युक्तांच्या बेसुमार वक्तव्याचा खुलासा करावा म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी मागणी केली आहे की, आयुक्तांनी शहरवासीयांची जाहीर माफी मागावी.

यासंदर्भात मारुती भापकर यांनी पिंपरी चिंचवड शहराची ओळख इतिहास आणि गौरवगाथा उदाहरणांसहित लेखी स्वरूपात सांगून पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण देत आयुक्तांनी माफी मागण्याची विनंती केली आहे.

"पिंपरी चिंचवड शहराला जगात कोण ओळखते? या आपल्या बेजबाबदार वक्तव्याबद्दल पिंपरी चिंचवड करांची आयुक्त साहेबांनी जाहीर माफी मागावी"

मारुती भापकर लिहितात, "पिंपरी चिंचवडला जगात कोणी ओळखत नाही, अशा आशयाचे बेताल आपण नुकतेच वक्तव्य केले त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत.
पिंपरी चिंचवड शहराच्या आयुक्तपदी पालक म्हणून आपण कार्यभार हाती घेतला असून या अत्यंत महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्यानंतर पंधरा दिवसांत आमच्या शहराबद्दल पूर्ण माहिती न घेता असे बेजबाबदार विधान करणे हे अजिबात जबाबदारीचे लक्षण नाही. त्यामुळे शहरातील पुढील महत्त्वाच्या बाबींचा आयुक्त म्हणून आपण अभ्यास करावा. 
१) महाराष्ट्रातच नव्हे, भारत देशातच नव्हे तर जगभरात वर्षानुवर्ष सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो. गणपती बाप्पा "मोरया"ही घोषणा केली जाते. त्या मोरया गोसावी ची संजीवन समाधी या शहरात आहे. 
२) भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करणारे एकाच घरातील तीन चापेकर बंधू फासावर हे याच शहरातले आहेत.
३) छत्रपती शिवाजी महाराज व पेशवे काळातील अनेक संदर्भ या शहराला आहेत तसेच छत्रपती शिवाजी महाराज व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे.
४) प्राचीन भारतात भोज राजाची नगरी भोजापूर तीच आजची भोसरी पिंपरी चिंचवड शहरात आहे.
५) पिंपरी चिंचवड शहराच्या उजव्या बाजूला कैवल्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर माऊली यांची संजीवन समाधी आहे.
६) पिंपरी चिंचवड शहराच्या डाव्या बाजूला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे देहुगाव आहे.
७) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांना वेळेत औषध मिळाले नाही म्हणून भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पुढाकार घेऊन सन१९४९ला पिंपरी येथे एच.ए.कंपनीची स्थापना केली
८) कै. यशवंतरावजी चव्हाण व कै. अण्णासाहेब मगरांच्या दूरदृष्टीतून सन १९५० अल्फा लावल, सँडविक, एस के एफ या स्वीडिस कंपन्या, तसेच टेल्को, बजाज आदि वाहन निर्मितीचे कारखाने, ऑटोमोबाईल हब, आयटी हब तसेच सुमारे सात हजार पेक्षा अधिक लहान मोठे कारखाने महाराष्ट्रातील व देशातील, जगभरातील हाताला काम देणारी औद्योगिक नगरी म्हणून या शहराचा जगाला परिचय आहे
पिंपरी चिंचवड शहराला फार मोठा आणि देदीप्यमान असा इतिहास आहे. या शहरात अनेक राजवटी झाल्या आहेत. संत, साधू, क्रांतिकारक, उद्योजक, कामगार यांची ही पवित्र भूमी आहे. 
एकेकाळी आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका असणाऱ्या महानगरपालिकेचे आयुक्तां म्हणून पिंपरी चिंचवड शहराला जगात कोणी ओळखत नाही, असे बेजबाबदारपणाचे विधान करणे, हे खरंच आपल्या प्रतिष्ठेला शोभत नाही. 
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व गांधर्व महाविद्यालय यांची तुलनाच होऊ शकत नाही. तुलना ही दोन समान विषयाबाबत, गोष्टीबाबत होते, एवढेही भान आपल्यासारख्या आयुक्त पदावरील व्यक्तीला नसावे, हे अत्यंत खेदजनक आहे. आणखी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, हे चुकीचे विधान बोलल्यानंतर शहरात जागोजागी उद्रेक झाला; अनेकांनी त्यांच्या त्यांच्या परीने निषेध केला आहे; तरीदेखील आपण अद्यापपर्यंत दिलगिरी देखील व्यक्त केली नाही, याचे अत्यंत वाईट वाटते. आपले चुकले हे जर आपण मोकळेपणाने मान्य केले व तसे आपण जाहीरपणे केले, तर शहरवासीय नक्की समजून घेतील, याबद्दल आयुक्तांनी खात्री बाळगावी; कारण ही वारकऱ्यांची भूमी आहे. येथे ज्ञानोबा-तुकोबांचे निस्सीम भक्त या शहरात राहतात. त्यांचे मन विशाल आहे. म्हणूनच आपण चुकलो आहे, हे आपण जाहीरपणे कबूल करावे. झालेल्या चुकीबद्दल पिंपरी चिंचवड करांची जाहीर माफी मागावी, अशी विनंती माजी नगरसेवक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी आयुक्तांच्या ई मेल आयडीवर लेखी पत्र पाठवून केली आहे.

औंधमध्ये माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा १२ एप्रिलला


| सांगावा न्यूज | औंध, दिनांक १ एप्रिल : जनता शिक्षण संस्था संचालित श्री शिवाजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, औंध येथील SSC २००२- २००३ व HSC बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहसंमेलन मेळावा रविवार, दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा सकाळी ९.०० ते दुपारी १.०० या वेळेत शाळेच्या प्रांगणात पार पडणार असून, या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी, शिक्षकवर्ग आणि कर्मचारी यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या स्नेहमेळाव्याचा मुख्य उद्देश म्हणजे जुन्या आठवणींना उजाळा देणे, मित्र-मैत्रिणींना पुन्हा एकत्र आणणे आणि शाळेशी असलेले नाते अधिक दृढ करणे हा आहे. कार्यक्रमात दीपप्रज्वलन, स्वागत समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, शिक्षकांचा सत्कार, माजी विद्यार्थ्यांचे अनुभव कथन आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या मेळाव्याद्वारे माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी योगदान देण्याचा उपक्रमही हाती घेतला असून, शाळेच्या विकासासाठी विविध योजना राबविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आयोजक समितीने अल्पावधीतच मोठ्या संख्येने माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यात यश मिळवले असून, सर्व समित्या समन्वयाने कार्यरत आहेत. त्यामुळे हा मेळावा अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात पार पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

“हा कार्यक्रम केवळ एक मेळावा नसून, जुन्या मैत्रीचा, आठवणींचा आणि शाळेशी असलेल्या भावनिक नात्याचा उत्सव आहे,” असे आयोजकांनी सांगितले. सर्व माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अशी माहिती दीपक खुडे यांनी दिली आहे.

मंगळवार, ३१ मार्च, २०२६

महिला व लोणावळा शहर पत्रकार संघ आयोजित महिलादिनानिमित्त महिला पत्रकार व रणरागिणीचा सन्मान संपन्न


| सांगावा न्यूज | लोणावळा, दिनांक २९ मार्च : लोणावळा येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद
मुंबई संलग्न पुणे जिल्हा महिला पत्रकार व लोणावळा
शहर पत्रकार संघाच्या वतीने राज्यस्तरीय महिला पत्रकार व रणरागिणीना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या
सुरवात महिलादिन विशेष काव्य मैफिलीने करण्यात आली. सादरकर्त युवा साहित्य प्रतिष्ठान मुंबई. कवी संतोष खारटमोल, कवी आनंद रांजणे, कवी ओमकार देसाई, कवीयत्री सविता देशमुख यांनी अप्रतिम कविता सादर केल्या.
सदर काव्य मैफिलीत छोटी कलाकार मृण्मई काळे व कलाकार शोभा आहेर यांनी सुंदर कविता सादर केली. 
स्वागत गीत सुनिल मस्के यांनी आपल्या सुरेख व दमदार आवाजात "जय जय महाराष्ट्र माझा" सादर केले. प्रस्तावना पुणे जिल्हा अध्यक्ष श्रावणी कामत यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा.सारिकाताई सुनिल आण्णा शेळके ह्या होत्या.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अध्यक्षा शोभा जयपुरकर, सरचिटणीस विद्या म्हासूर्णेकर, जिल्हा अध्यक्ष सुनिल लोणकर, राज्य कार्यकारणीचे सदस्य अनिल वडघुले, जेष्ठ पत्रकार चंद्रकांत जोशी, नगराध्यक्ष राजेन्द्र सोनावणे, नंदकुमार वlळंज (उद्योजक )
व जेष्ठ पत्रकार कुमठकर श्रीराम यांनी मनोगत व्यक्त केल्या. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शन खाली हा कार्यक्रम संपन्न झाला. महिला हे घर सांभाळून बाहेरची काम करतात त्यांना त्यांच्या कामाची पावती व पाठीवर थाप मिळावी हा छोटा सा प्रयन्त यावेळी केला असल्याचे आयोजक श्रावणी कामत यांनी सांगितले.

यावेळी वसंत व्याख्यान माला लोणावळा, नेतृत्व बचत गट, वुमन्य फाउडेशन, इंडियन स्काउट गाईड 
फेलोशिप लोणावळा गिल्ड, आधारस्तंभ बचत गर, वैदही बचत गट, निवारा वृद्धाश्रम च्या छाया काळे, 
हिरकणी महिला स्वयंसहायता बचत गट सिधुताई कविश्वर, डॉ, सिमा शिंदे परमेश्वरी दामले, विभावरी इंगळे, नयना आभाळे, दक्षता कमिटी, दामिनी पथक, जेष्ठ नागरीक संघ यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व महिला पत्रकारांचे ट्रॉफी व शाल देऊन सन्मान करण्यात आले.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सारिका ताई शेळके,
दिपालीताई हुलावळे , रेश्मा देवकर, नंदकुमार वाळुंज (उद्योजक), अनिल वडघुले, सुनिल लोणकर (जिल्हा अध्यक्ष ), राजेद्र सोनावणे (नगराध्यक्ष )सभापती स्वप्ना कदम, नारायण पळिकर, शोभा जपुरकर, विद्या म्हासुर्णेकर, लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष adv संजय पाटील, पुणे शहर अध्यक्ष प्रमोद गव्हाणे,विशाल विकारी,माऊली भोसले,प्रशांत पुराणिक,बापु पाटील, श्रीराम कुमठेकर, जेष्ठ पत्रकार चंद्रकांत जोशी ,डॉ. हेमंत अगरवाल,मा.नगरसेविका, ब्रिन्दा गणत्रा,उमा मेहता, सुषमा कडू सुजाता गुरव रेखा भेगडे ,प्रज्ञा आबनवे,वर्षा चव्हाण,सुनिता आगळे,आदी मान्यवर उपस्थित होते तसेच आदित्य कामत,प्रफुल सोनवणे सुनिल मस्के, अवनी आगळे यांनी कार्यक्रमांस मोलाचा सहभाग नोंदवला. सूत्रसंचालन सुनिता कसबे व रश्मी शिरसकर तर आभार शोभा जयपुरकर यांनी मानले.

दैनिक महिला संवादचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड , दिनांक ३१ मार्च : दैनिक महिला संवादचा प्रथम वर्धापन दिन दिनांक २९ मार्च रोजी आरंभ बँक्वेट हॉल येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. नगरसेविका अर्चना तापकीर, ॲड. स्नेहा कांबळे, कार्यकारी संपादक विद्या जाधव व उपसंपादक सुनंदा निक्रड यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री ज्ञानेश भुकेले यांच्या मार्गदर्शनाखाली श्री कैलास थोपटे यांच्या हस्ते महिला संवाद न्यूज पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमास ॲड. वंदना गायकवाड, नगमा शेख, उमा बगाडे, माधुरी शहापूरे, किरण साळवे, दीपाली सौदागर,मनिषा असादे, दिपिका सावंत, रत्नमाला देवमाने, चंद्रकला चव्हाण, अनिता लोहार, दिशा कदम, सोनाली कांबळे, आशा मुळीक, श्री अप्पासाहेब माने, प्रा. संजीव सूर्यवंशी, भागचंद चव्हाण, नरेश असादे, महेश सोनटक्के,प्रशांत थोरात,संजय गायके तसेच संस्कार प्रतिष्ठानची टीम उपस्थित होती. ज्येष्ठ पत्रकार विकास साळवे यांनीही उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर सूर्यवंशी, डिजिटल मिडिया परिषद शहराध्यक्ष विनय सोनवणे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद उपाध्यक्ष गणेश मोकाशे, महावीर जाधव, माऊली भोसले, रमेश साठे, संजीव सूर्यवंशी, सिद्धांत चौधरी, हनुमंत रामदासी, नरेश जीवनाल

उपस्थित मान्यवरांनी दैनिक महिला संवादच्या कार्याचे कौतुक करत महिलांच्या सशक्तीकरणासाठी अशा व्यासपीठांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ नाडे यांनी केले. प्रारंभी संपादक ज्योती आडेकर यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या वर्षभरातील वाटचालीचा आढावा घेत पुढील ध्येयधोरण स्पष्ट केले.

सोमवार, ३० मार्च, २०२६

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान

जागतिक महिला दिन साजरा करून पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या रणरागिणींचा सन्मान 

विविध क्षेत्रातील रणरागिणींचा पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने केला सन्मान 

जागतिक महिला दिनानिमित्त पत्रकारांकडून रणरागिणींचा गौरव

| सांगावा न्यूज| पिंपरी चिंचवड, दिनांक २९ मार्च २०२६ : जागतिक महिला दिन हा आठ मार्च रोजी जगभर साजरा केला जातो. तसेच मार्च महिन्यात वेगवगेळ्या तारखांना देखील साजरा केला जातो. पिंपरी चिंचवड शहरातील सायन्स पार्क येथे दिनांक २९ मार्च रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्वोत्कृष्ट रणरागिणींचा सन्मान करण्यात आला. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई, संलग्न असलेल्या पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मिडिया परिषद पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड पत्रकार संचाचे अध्यक्ष सागर गोपाळ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात झालेल्या या कार्यक्रमाला मान्यवरांसह शेकडो नागरिक उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रविभाऊ लांडगे आणि उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. समाजातील महिलांचे योगदान अधोरेखित करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडल्याच्या भावना यावेळी डिजिटल मिडिया परिषदेचे शहराध्यक्ष विनय सोनवणे यांनी व्यक्त केल्या. 

विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या या सोहळ्यांमध्ये राजमाता जिजाऊ पुरस्कार - डॉ. किशोरी आपटे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार - सुप्रिया सचिन मंडलिक, त्यागमूर्ती माता रमाई पुरस्कार - सुभद्रा आत्माराम मोकाशे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार - स्वरांजली माने, पशुवैद्यकीय सेवारत्न पुरस्कार - डॉ. पूजा बोंबले, पिंपरी चिंचवड संस्कारत्न पुरस्कार - भारतीय न्यायाधीश, पिंपरी चिंचवड कलारत्न - ज्योती भीमाशंकर सेतसंदी, पिंपरी चिंचवड सिनेरत्न पुरस्कार - कृत्तिका तुळसकर, आणि रुग्णसेवा विशेष सन्मान स्वाती कुलकर्णी, शोभा तळेकर, शोभा ढोले यांना प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एकूण १४ महिला बचत गटांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पद्मजा, मैत्री अपंग, समृद्धी, आई, श्रीकृष्ण, साई चरण, सुनिधी, आनंदी, साई, जीवन ज्योती, जास्वंदी, विघ्नहर्ता, रोहिणी आणि यशोदा महिला बचत गटांचा सन्मानचिन्ह व वृक्ष रोप देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रमिला सुनील आढाव (महिंद्र स्पेअर बिझनेस युनीट, कान्हे हेड ऑफ दी डिपार्टमेंट - डेटा एन्ट्री विभाग) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

महिलांच्या सन्मानार्थ कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे आभार मानून - वाचन, अभ्यास, संशोधन ज्ञान, विज्ञान, आरोग्य, महिला सक्षमीकरण यासाठी पिंपरी चिंचवड शहरामध्ये नवीन इन्फ्रास्ट्रक्टर उभे केले जाणार असून या नवनिर्मितीत पुरुषांप्रमाणेच महिलांना संधी उपलब्ध करून देणार असल्याच्या भावना महापौर रविभाऊ लांडगे यांनी व्यक्त केल्या. तर आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहून कर्तृत्ववान रणरागिणींचा सन्मान करता आला आणि महिलांसोबत विचारांची देवाणघेवाण करता आल्याचे, उप महापौर शर्मिलाताई बाबर यांनी समाधान व्यक्त केले. तर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद समाज हितासाठी, पत्रकारांच्या हितासाठी कार्य करीत असताना परिषेदेशी संलग्न असलेल्या पिंपरी चिंचवड पत्रकार संघाने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याची परंपरा कायम ठेवत महिला भगिनींचा केलेला सन्मान इतरांना प्रेरणादायी ठरत असल्याची भावना पत्रकार परिषेद विश्वस्त शरद पाबळे यांनी व्यक्त केली.

या सोहळ्यात शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्य, उद्योग, कला, क्रीडा, विज्ञान, वैद्यकीय आदी क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानचिन्ह, शाल व झाडाचे रोप देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना त्यांना अधिक सक्षम बनविण्यासाठी समाजाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार , सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन्मानित महिलांनीही आपल्या यशामागील संघर्ष व अनुभव शेअर करत इतर महिलांना प्रेरणा दिली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड शहराचे महापौर रविभाऊ लांडगे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, मार्गदर्शक उपस्थिती अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषेद विश्वस्त शरद पाबळे, परिषेद उपाध्यक्ष गणेश मोकाशे, पुणे जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर मंचावर उपस्थित होते. तर परिषद जिल्हा पदाधिकारी चिराग फुलसुंदर, अनिल वडघुले, श्रीमती रेखा भेगडे, मारुती बानेवार, श्रीमती प्रज्ञा आबनावे, याच बरोबर पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे व डिजिटल मिडियाचे शिलेदार डिजिटल मिडिया शहर उपाध्यक्ष संतोष गोतावळे, महावीर जाधव, अशोक कोकणे, रमेश साठे, अनंता इंगळे, अविनाश कांबीकर, डॉ. देवीदास शेलार, पराग डिंगणकर, संजीव सूर्यवंशी, माऊली भोसले, सिद्धांत चौधरी, हनुमंत रामदासी, राकेश पगारे, जेष्ठ परिषेद सदस्य प्रकाश जमाले, किशोरअण्णा लष्करे, नरेश जीनवाला, श्रीमती अनुष्काताई, विजय न्यायाधीश, राहुल जाधव, इत्यादी पत्रकार उपस्थित होते. तसेच सन्मानार्थी निवड समितीमध्ये लिटिल सायंटिस्ट चे दत्तात्रय गिरमकर, निलेश बोराडे, आणि काव्य मित्रचे राजेंद्र सगर  उपस्थित होते. दरम्यान या सन्मान सोहळ्यामध्ये काव्य मैफिल संपन्न झाली. कवी प्रकाश गायकवाड, कवी देवेंद्र गावंडे, प्राध्यापिका कवयित्री सुषमा भालेराव यांनी उपस्थितांची मने जिंकणाऱ्या कविता सादर केल्या. काव्य संचालन राजेंद्र सगर यांनी केले. तर विजय चव्हाण व स्वाती चव्हाण यांनी मान्यवरांना कला कुसर दाखवत वैविध्यपूर्ण फेटे परिधान केले.

जागतिक महिला दिनानिमित्त योजित कर्तृत्ववान रणरागिणींच्या या उपक्रमामुळे समाजात महिलांच्या योगदानाची जाणीव अधिक दृढ होऊन महिलांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर गोपाळ सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिजिटल मिडिया परिषद शहराध्यक्ष विनय सोनवणे यांनी केले तर आभार परिषेद सदस्य अनिल वडघुले यांनी मानले. 









































गुरुवार, २६ मार्च, २०२६

जागतिक वन दिन व जागतिक जल दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वृक्षारोपण

 

| सांगावा न्यूज | पुणे, दिनांक २६ मार्च २०२६ : जागतिक वन दिवस आणि जागतिक जल दिनाचे औचित्य साधून, जागतिक स्तरावर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील राजश्री शाहू गार्डन, चिंचवड,पुणे या ठिकाणी पर्यावरण संरक्षणसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या आणि मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या वडाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

दरवर्षी २१ मार्च रोजी जागतिक वन दिन जगभरात साजरा केला जातो, ज्याचा मुख्य उद्देश सर्व प्रकारच्या वनांचे महत्त्व अधोरेखित करणे आणि त्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करणे असून, संयुक्त राष्ट्र महासभेने २०१२ मध्ये या दिनाची घोषणा केली. हा दिवस हवामान बदल रोखण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यासाठी प्रेरित करतो. वने हे पृथ्वीचे "फुफ्फुस" मानले जातात, कारण ती कार्बन डायऑक्साइड शोषून हवा शुद्ध ठेवतात आणि जैवविविधतेला आधार देतात. तसेच २२ मार्च हा दिवस जगभरात जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो, ज्याचा मुख्य उद्देश पाण्याचे संवर्धन, संरक्षण आणि शाश्वत वापरासाठी लोकांमध्ये जागृती करणे. सुरक्षित पिण्याच्या पाण्याच्या महत्त्वाबद्दल लोकांना जागरूक करणे हा आहे. या दोन्ही दिनाचे औचित्य साधून,जागतिक स्तरावर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या राजश्री शाहू गार्डन,चिंचवड,पुणे या ठिकाणी पर्यावरण संरक्षणसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या आणि मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या वडाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी शाहू गार्डन चे रक्षक गार्ड श्री.सलीम शेख,श्री.अजित सांगोलकर आणि अभिषेक गवळी यांना राष्ट्रीय वृक्ष मित्र पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.देवा तांबे,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सचिन नरुटे, महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा सौ.धनश्री नरुटे,महाराष्ट्र राज्य महिला निरीक्षक सौ.स्नेहा तांबे,महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष सौरभ हजारे, तसेच संस्थेचे पुणे जिल्हा पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवडच्या पाणीटंचाईवर आमदार अमित गोरखे आक्रमक : ३० एम.एल.टी. वाढीव पाण्याची आणि जॅकवेल प्रकल्पाची सभागृहात मागणी

विधान परिषदेत ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे वेधले लक्ष

| सांगावा न्यूज | पिंपरी-चिंचवड, दिनांक २५ मार्च २०२६ : पिंपरी-चिंचवड शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्या तुलनेत अपुरा पडणारा पाणीपुरवठा या गंभीर विषयावर आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत आवाज उठवला आहे. शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी अतिरिक्त ३० एम.एल.टी. पाणीसाठा मंजूर करावा आणि आंध्र धरण प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून सभागृहात केली.

यावेळी बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले की, "पिंपरी-चिंचवड हे राज्याचे महत्त्वाचे औद्योगिक आणि निवासी केंद्र आहे. मात्र, सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा वाढत्या लोकसंख्येसाठी अपुरा पडत आहे. यामुळे नागरिकांना नियमित आणि पुरेशा दाबाने पाणी मिळण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे"

* प्रमुख मागण्या *

# ३० एम.एल.टी. अतिरिक्त पाणीसाठा : पुणे महानगरपालिकेकडे सध्या वर्ग होत असलेला ३० एम.एल.टी. पाणीसाठा पिंपरी-चिंचवड शहरासाठी मंजूर करण्यात यावा, जेणेकरून नागरिकांची तात्पुरती गरज भागेल.

# जॅकवेल प्रकल्पासाठी जागा : आंध्र धरण परिसरात सिंचन विभागाची सुमारे अडीच एकर जागा उपलब्ध झाल्यास, त्या ठिकाणी जॅकवेल प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करता येईल.

# दीर्घकालीन उपाययोजना : जॅकवेल प्रकल्प पूर्ण झाल्यास शहरासाठी दीर्घकालीन आणि मुबलक पाणीसाठा उपलब्ध होऊ शकेल, ज्यामुळे भविष्यातील पाण्याची चिंता मिटेल.

या विषयाचे गांभीर्य सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. संबंधित विभागाने यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती केली आहे. शहराच्या मूलभूत गरजांसाठी आपण सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही आमदार अमित गोरखे यांनी यावेळी स्पष्ट केले.

बुधवार, २५ मार्च, २०२६

अखेर बारामती विमान दुर्घटनेत गुन्हा दाखल रोहित पवारांच्या लढ्याला कर्नाटकातून यश

| सांगावा न्यूज | पुणे, दिनांक  २५ : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार याच्या लढ्याला अखेर यश आलं असून बारामतीमधील अजित पवार   यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी अखेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बारामती विमानतळाजवळ झालेल्या लियरजेट 45 विमान दुर्घटनेप्रकरणी कर्नाटकाच्या बंगळुरू  येथील शेशाद्रीपुरम पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. या दुर्घटनेमागे मोठा गुन्हेगारी कट असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आजच रोहित पवार यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. नागपुरात बस स्टॉपवरुन चार्जर चोरीला गेली म्हणून गुन्हा दाखल झाला, ⁠चप्पल चोरीला गेली म्हणून गुन्हा दाखल झाला. ⁠अंगणात झाडाच्या फांद्या आल्या म्हणून गुन्हा दाखल झाला, मात्र अजित दादांच्या संदर्भात गुन्हा दाखल झाला नाही, ⁠ज्याचं जळतं त्यालाच कळतं, असेही रोहित पवार यांनी म्हटले होते.

अजित पवार प्रवास करत असेले मुंबईहून बारामतीकडे येणारे VT-SSK नोंदणी असलेले बॉम्बार्डियर लियरजेट ४५ विमान २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.४३ ते ८.४५ वाजण्याच्या सुमारास कोसळले. हे विमान VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे चालवले जात होते. या दुर्घटनेत विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये त्या वेळचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचाही समावेश होता. या प्रकरणी मृत अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १७३(१) अंतर्गत ‘झिरो FIR’ म्हणून तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी त्यांनी २५ फेब्रुवारी रोजी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे तसेच २६ फेब्रुवारी रोजी बारामती पोलीस ठाण्यात संपर्क साधला होता. मात्र, FIR नोंदवण्यात आला नव्हता. त्यानंतर पुणे सीआयडीकडून केवळ अपघाती मृत्यू अहवालाच्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले होते.रोहित पवार यांच्या तक्रारीनुसार, ही दुर्घटना केवळ अपघात नसून उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य करणाऱ्या मोठ्या गुन्हेगारी कटाचा भाग असू शकतो. तक्रारीत विमान सुरक्षेच्या नियमांचे पद्धतशीर उल्लंघन, नोंदींची बनावट कागदपत्रे तयार करणे, देखभाल आणि ऑपरेशनमध्ये गंभीर निष्काळजीपणा अशा अनेक बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. २४ फेब्रुवारी रोजी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने  सादर केलेल्या सुरक्षा लेखापरीक्षण अहवालात  कंपनीची काही विमाने निष्काळजीपणामुळे उड्डाणासाठी अयोग्य असल्याचे नमूद करण्यात आले असून, ती विमाने ग्राउंड करण्यात आल्याचेही सांगितले आहे. तसेच, दुर्घटनाग्रस्त  विमानाने सुमारे ४९१५ उड्डाण तास पूर्ण केले होते, जे ५००० तासांच्या अनिवार्य इंजिन ‘टाइम बिफोर ओव्हरहॉल’  मर्यादेच्या अत्यंत जवळ होते. तरीही कंपनीने व्यावसायिक वापरासाठी विमान चालू ठेवले होते, ज्यामुळे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला, असे तक्रारीत म्हटले आहे.