Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, १६ एप्रिल, २०२६

मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात पिंपरी चिंचवड शहरातील २० पत्रकार सहभागी होणार


पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मिडिया परिषदेचे पत्रकार उदगीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी सज्ज

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १६ एप्रिल २०२६ : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन यंदा लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे दिनांक १८ आणि १९ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने पत्रकार या अधिवेशनास सहभागी होणार असून पत्रकारांच्या आणि समाज हिताच्या विविध विषयांवर चर्चासत्रे, मान्यवरांची मार्गदर्शन, पत्रकारांच्या आणि कुटुंबियांच्या हिताच्या गोष्टी, सद्य राजकीय व सामाजिक परिस्थित यावर विचार विनिमयासह सांस्कृतिक कार्यकर्त्यांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असलेल्या या अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बांधकाम मंत्री  शिवेंद्रसिंहराजे भोसले, बाबासाहेब पाटील, राजेंद्र दर्डा, मधुकर भावे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार संजय बनसोडे हे स्वागताध्यक्ष आहेत. आमदार रोहित पवार, खासदार संजय राऊत यांच्या प्रकार मुलाखती होणार आहेत. या राष्ट्रीय अधिवेशनात पिंपरी चिंचवड शहराचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मिडिया परिषद पिंपरी चिंचवड चे सदस्य पदाधिकारी असे एकूण २० पत्रकार सहभागी होणार आहेत, यामध्ये गणेश मोकाशे (परिषदेचे राज्य उपाध्यक्ष) पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात डिजिटल मिडिया परिषदेचे शहराध्यक्ष विनय सोनवणे, महावीर जाधव, सिद्धांत चौधरी, हनुमंत रामदासी , संतोष गोतावळे, पराग डिंगनकर, नितीन कालेकर, विनायक गायकवाड, मारुती बानेवार, अविनाश आदक, अनिल भालेराव, नरेश जीनवाल, संभाजी बारबोले, राहुल जाधव यांच्या सह इतर ज्येष्ठ पत्रकार अधिवेशनात सहभागी होणार आहेत.

पत्रकारांच्या आडी अडचणी, पत्रकारितेत कार्य करीत असतांना सामाजिक व राजकीय परिस्थिती, नागरी हिताचे वार्तांकन इत्यादी विषयांवर विचारांची देवाण घेवाण होणार आहे. प्रसिद्ध पत्रकार प्रसन्न जोशी, विशाल परदेशी, प्रज्ञा पोवळे, श्वेता दांडेकर, सौरभ कोरटकर, विशाल पाटील सहभागी होत आपले अनुभव सांगतील. कॉंग्रेसचे हनुमंत पवार, राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण, शिवसेनेचे राहूल लोंढे, उबाठाचे जयेश वाणी हे विविध राजकीय पक्षांचे प्रवक्ते सहभागी होतील. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, जय महाराष्ट्रचे संपादक प्रसाद काथे आणि मुक्तपीठचे संपादक तुळशीदास भोईटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

अधिवेशनास राज्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, डिजिटल मिडिया परिषदेचे प्रमुख अनिल वाघमारे, विभागीय सचिव तसेच अधिवेशन मुख्य संयोजक सचिन शिवशेट्टे, रवी उबाळे, मराठवाड्याचे उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, उदगीर तालुका मराठी पत्रकार परिषदेचे  अध्यक्ष युवराज धोतरे , लातूर जिल्हा डिजिटल मिडीयाचे अध्यक्ष बिभीषन मद्देवाड , पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे  निमंत्रक अर्जुन जाधव ,जिल्हा डिजिटल मिडीयाचे सचिव सिद्धार्थ सुर्यवंशी तसेच परिषदेचे सर्व उपाध्यक्ष, विभागीय सचिव आणि कार्यकारिणी सदस्यांनी आवाहन केले आहे. मिलिंद अष्टीवकर हे अधिवेशनाचे अध्यक्ष असतील. या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाची सांगता १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत होईल.

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित विकासकामांना 'स्थायी'ची मंजुरी


| सांगावा न्यूज | पिंपरी, दि. १५ एप्रिल २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधूकर पवळे सभागृहात पार पडली. सभेच्या सुरुवातीला दिवंगत गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. 

यावेळी स्थायी समिती सदस्यांसह महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व प्रशासनाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यात आली. विशेषतः झोपडपट्टी व दाट वस्ती भागांमध्ये गटर करणे, स्टॉर्म वॉटर लाईन टाकणे, शौचालयांची दुरुस्ती, रंगरंगोटी व मनपा इमारतींची देखभाल यांसारखी कामे ह, अ, ब, क, ड, इ, फ व ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या सिद्धार्थनगर, गुलाबनगर, जयभीमनगर, महात्मा फुलेनगर, भारतमातानगर, राजीव गांधीनगर, विद्यानगर, दत्तनगर, शंकरनगर, इंदियानगर, काळभोरनगर, गांधीनगर, बालाजीनगर, संजय गांधीनगर, शांतीनगर आदी परिसरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहेत.

शहरातील रस्ते व वाहतूक सुधारण्यासाठी निगडी-दापोडी रस्त्यावरील बसस्थानक व डेडिकेटेड लेन दुरुस्ती, सांगवी-किवळे रस्त्याचे डांबरीकरण, निगडी टिळक चौक ते दुर्गानगर रस्त्यावरील कामे, तसेच प्रभाग क्र.२ मधील चिखली महादेवनगर, रोकडेवस्ती, मोशी व जाधववाडी परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स व बीबीएम पद्धतीने डांबरीकरण करण्यास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१६ मधील रावेत, वाल्हेकरवाडी व किवळे येथील रस्त्यांची दुरुस्ती, प्रभाग क्र.२४ मधील सदाशिव कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, आनंद पार्क परिसरातील रस्ते कॉंक्रीटीकरण, तसेच प्रभाग क्र.२५ मधील वाकड, पुनावळे, ताथवडे भागांमध्ये विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. पिंपळे निलख, विशालनगर, कस्पटेवस्ती, वेनुनगर, कावेरीनगर परिसरात पावसाळी पाण्याच्या लाईनची दुरुस्ती व नवीन पाईपलाईन टाकणे, तसेच फूटपाथ व पेव्हिंग ब्लॉक दुरुस्तीची कामेही हाती घेण्यात येणार आहेत.

वाहतूक व नागरी नियोजनाच्या दृष्टीने पिंपळे सौदागर येथील पीके चौक सिग्नल फ्री करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार नेमणे, तसेच पिंपळे गुरव येथील वाकड ते नाशिक फाटा रस्त्यावर कल्पतरू चौकात सबवे उभारण्यासाठी सल्लागार नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच प्रभाग क्र.२७ मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात रेलिंग करणे व मनपा शाळांमधील स्थापत्य विषयक कामेही करण्यात येणार आहेत.

आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी कै. प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय, आकुर्डी व नवीन भोसरी रुग्णालयातील क्ष-किरण विभागासाठी बॅटरी खरेदी, जैववैद्यकीय घनकचरा व्यवस्थापन, तसेच नवीन थेरगाव गावठाण येथे ३४० खाटांच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी फर्निचर खरेदीस मान्यता देण्यात आली. याशिवाय यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात मानधन तत्त्वावर विविध पदांची भरती करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. आरोग्य विभागासाठी ४ सक्शन युनिट वाहने व प्रत्येकी २ मजूर उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजासाठी महत्त्वाचे निर्णय घेत मनपा शाळांमध्ये १३८ डेटा एन्ट्री ऑपरेटर (प्राथमिक १२० व माध्यमिक १८) २४ महिन्यांसाठी नेमण्यास, विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, प्रगतीपुस्तके व प्रवेश फॉर्म छपाईस, तसेच संगणकीय केबल नेटवर्क उभारणीस मान्यता देण्यात आली. महापालिकेचा विकास आराखडा मराठी भाषेत प्रसिद्ध करण्यासाठी येणाऱ्या खर्चासही मंजुरी देण्यात आली. तसेच ई-मेल अकाऊंटचे नूतनीकरण व दैनंदिन देखभाल कामास मुदतवाढ देण्यात आली आहे.

स्वच्छता व पर्यावरणाच्या दृष्टीने शौचालय साफसफाई व देखभाल करणाऱ्या महिला बचत गटांना ६ महिन्यांऐवजी ११ महिन्यांची मुदतवाढ, त्यांच्या मानधनात वाढ, तसेच शून्य कचरा प्रकल्पांतर्गत मे. आसरा सोशल फाऊंडेशन संस्थेस १७ शाळांमध्ये प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात आली. श्रीकृष्ण महिला बचत गटाच्या वेतन खर्चासही मंजुरी देण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजासाठी वाहन भाडेतत्वावर घेणे, अग्निशमन विभागातील ११ वाहनांची दुरुस्ती, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील फायर सेफ्टी ऑडिटनुसार कामे, स्मशानभूमींमध्ये चिमणी बसविणे, रस्ते दुभाजकांची देखभाल, गटार व रस्ते साफसफाई, अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर कारवाई, आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे या कामांसाठीही खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

याशिवाय पीएमपीएमएलच्या सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील नियमित संचलन तुटीसाठी अनुदान देण्यास तसेच पीजीआय/वायसीएमएच (PCMC) साठी विविध शासकीय व विद्यापीठ शुल्क भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

एकूणच, स्थायी समिती सभेत शहरातील सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा बळकटीकरण, आरोग्य व स्वच्छता सुधारणा, तसेच प्रशासन अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने व्यापक निर्णय घेण्यात आले आहेत.

सलगरा बु येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी



| सांगावा न्यूज | सलगरा बु, दिनांक १६ एप्रिल २०२६ : विश्वरत्न, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती १४ एप्रिल रोजी सलगरा बु येथे साजरी करण्यात आली. यावेळी गावातील सरपंच शांताबाई साळुंके व प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सलगरा बु. गावातील जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष भैय्यासाहेब कांबळे म्हणाले की, "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समता, स्वातंत्र्य आणि न्यायाचा विचार हा आपल्या संविधानाचा पाया आहे. त्यांनी दिलेल्या शिका, संघटित व्हा, संघर्षाच्या करा या विचार तंत्रामुळे समाजात परिवर्तन घडले. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांना केवळ स्मरणात न ठेवता आचरणात आणणे ही काळाची गरज आहे"

दरम्यान सुरुवातीला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि शांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पमाला व पुष्प अर्पण करून सामूहिक वंदना घेण्यात आली. भारतीय राज्यघटनेच्या प्रतीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांचे पालन करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केली. यावेळी सलगरा बु गावचे सरपंच शांताबाई साळुंके, स्वरूप साळुंखे, गोवर्धन महाळ, जयंती उत्सव समिती अध्यक्ष भैय्यासाहेब कांबळे, उपाध्यक्ष रणजीत मदाळे, सचिव विजय गायकवाड, खजिनदार बुद्धभुषण कांबळे,सदस्य सिद्धार्थ कांबळे, सदस्य जयदीप कांबळे, राजाभाऊ कांबळे, समाधान भोळे, रत्नदिप कांबळे, परमेश्वर क्षीरसागर, क्षितिज कांबळे, अमोल गायकवाड, विशाल गायकवाड, अशोक शंकरराव कांबळे, अशोक राजाराम कांबळे, धम्मपाल कांबळे, मधुकर कांबळे, देविदास कांबळे व सर्व बौद्ध बांधवा भीम आयुयायी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

बुधवार, १५ एप्रिल, २०२६

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १० इंग्रजी माध्यम शाळा अनधिकृत


अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याबाबत पालकांना शिक्षण विभागाकडून सूचना

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक . १५ एप्रिल २०२६ : सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १० खाजगी इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळा शासनाची आवश्यक परवानगी न घेता अनधिकृतरित्या चालविण्यात येत असल्याचे समोर आले आहे. संबंधित शाळांना यापूर्वीच शाळा बंद करण्याबाबत नोटीस देण्यात आलेली असतानाही या शाळा नियमबाह्य पद्धतीने सुरू ठेवण्यात आल्या आहेत. 

या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत सर्व पालकांना स्पष्टपणे सूचित करण्यात येत आहे की, त्यांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश अशा अनधिकृत शाळांमध्ये करू नये. अशा शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर व भविष्यातील शैक्षणिक मान्यतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या बाबतीत योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असून, अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश दिल्यास होणाऱ्या संभाव्य नुकसानीस संबंधित पालक स्वतः जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी.

तसेच, संबंधित सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना या निवेदनाद्वारे स्पष्ट इशारा देण्यात येत आहे की, शासनाची आवश्यक परवानगी प्राप्त केल्याशिवाय शाळा सुरू करू नयेत. अन्यथा, अनधिकृतपणे शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केल्यास महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयांनुसार संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी दिली आहे. 

तरी पालकांनी आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून केवळ शासनमान्य व अधिकृत शाळांमध्येच प्रवेश घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

*अनधिकृत इंग्रजी माध्यमाच्या शाळांची यादी पुढीलप्रमाणे*
ब्लोमिंग बर्ड्स, ताथवडे
लिटील स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल, चिंचवडेनगर
माऊंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल, कासारवाडी
डी. एम. के. इंटरनॅशनल स्कूल, कासारवाडी
माने इंग्लिश मिडीयम स्कूल, काळेवाडी
नर्चर इंटरनॅशनल स्कूल, काळजेवाडी, चऱ्होली
माईंडवर्ल्ड इंटरनॅशनल स्कूल, काळजेवाडी, चऱ्होली
हेम्स इंटरनॅशनल स्कूल, वाकड
कॅटलिस्ट इंटरनॅशनल स्कूल, चऱ्होली फाटा
गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल, मोशी

श्री शिवाजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, औंध येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा व कृतज्ञता सोहळा यशस्वी संपन्न


 | सांगावा न्यूज | पुणे, दिनांक १५ एप्रिल २०२६ :जनता शिक्षण संस्था, पुणे अंतर्गत श्री शिवाजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, औंध येथे दिनांक रविवार, १२ एप्रिल २०२६ रोजी १० वी (सन २००२–२००३) बॅचचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा व कृतज्ञता सोहळा अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला
या कार्यक्रमाला *विद्यमान प्राचार्य श्री नवले रवींद्रनाथ शिवराम, उपप्राचार्य श्री चव्हाण विठ्ठल नारायण, पर्यवेक्षिका सौ. स्वाती देशमुख, माजी प्राचार्य श्री जकाते जे. बी. (२००३ बॅच), तसेच जनता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व माजी प्राचार्य श्री नंदकुमार पाटील सर* यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागत कन्यांकडून गुलाबपुष्पांनी स्वागत करून करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण, शिववंदना, सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला पारंपरिक सुरुवात झाली. स्वागत गीत, प्रभावी सूत्रसंचालन आणि शिक्षकांचे मार्गदर्शनपर मनोगत यामुळे कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण ठरला. तसेच दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करून सर्वांनी भावपूर्ण स्मरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी *संगीता मनाळे, ज्योती गडेराव आणि माधुरी वायदंडे* यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. *स्वागत गीत संदीप गुरव, रुक्मिणी सुर्वे आणि ज्योती भोसले* यांनी सादर केले. माजी वि *द्यार्थी मनोगत adv. Abdul ढाले, स्वाती घायाळ आणि नेहा गोळे यांनी* व्यक्त केले, तर *शिक्षकीय मनोगत स्नेहलता जगताप मॅडम* यांनी मांडले. अध्यक्षीय मनोगत *महाविद्यालयाचे प्राचार्य श्री नवले सर* यांनी केले. *कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी सहयोगी प्राध्यापक डॉ. मल्हारी नागटिळक* यांनी केले.

या मेळाव्यात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पर्यावरणपूरक कुबेर (Crassula) रोप देऊन करण्यात आला. या माध्यमातून निसर्गप्रेम व सामाजिक संदेश देण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान विविध कमिटींच्या नियोजनामुळे मंडप, सजावट, छायाचित्रण, भोजन व्यवस्था, नोंदणी, स्वागत इत्यादी सर्व बाबी अत्यंत सुयोग्य पद्धतीने पार पडल्या. विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी अनेक माजी विद्यार्थी दूरवरून—चिपळूण, नाशिक, सासवड, बारामती, मुंबई आदी ठिकाणांहून आवर्जून उपस्थित राहिले. एकूण सुमारे १२० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती, ज्यामध्ये ४० ते ५० मुलींचा सहभाग लक्षणीय ठरला. 23 वर्षांनंतर एवढ्या मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी एकत्र येणे ही अभिमानाची बाब ठरली.

कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे—सर्व विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून महिलांचा सन्मान राखला, ज्यामुळे कार्यक्रमात स्नेह, आदर आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले. भोजन व्यवस्थाही उत्कृष्ट होती आणि सर्वांनी त्याचा मनसोक्त आनंद घेतला. या मेळाव्याच्या निमित्ताने २००२-२००३ बॅचच्या विद्यार्थ्यांनी शाळेला सुमारे ५०,०००/- रुपये किमतीचा लेझर प्रिंटर, स्कॅनर व झेरॉक्स मशीन भेट दिले. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसत होता. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थ्यांकडून या उपक्रमाचे मनापासून कौतुक झाले. हा स्नेह मेळावा केवळ एक कार्यक्रम न राहता—जुन्या आठवणींना उजाळा देणारा, मैत्रीचे बंध पुन्हा दृढ करणारा आणि कृतज्ञता व्यक्त करणारा एक अविस्मरणीय सोहळा ठरला.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बांधकाम मंत्री  शिवेंद्रसिंहराजे भोसले, बाबासाहेब पाटील, राजेंद्र दर्डा, मधुकर भावे यांच्या मुख्य उपस्थितीत 18 एप्रिल शनिवार रोजी परिषदेच्या अधिवेशनाचे भव्य उद्घाटन


देशभरातून 2500 पत्रकार उपस्थित राहणार

| सांगावा न्यूज | मुंबई, दिनांक १५ एप्रिल २०२६ : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचं ४४ वं राष्ट्रीय अधिवेशन १८ आणि १९ एप्रिल २०२६ रोजी रोजी उदगीर इथे होत आहे. उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहात असून लोकमतचे समुह संपादक मा. श्री. राजेंद्र दर्डा अधिवेशनाचे उद्घाटन करतील.आ. श्री. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.. बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री मा. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आहेत तर आमदार मा. श्री. संजय बनसोडे सह स्वागताध्यक्ष आहेत. परिषदेचे मुख्य विश्वस्त मा. श्री. एस.एम.देशमुख हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील तर मा. श्री. मिलिंद अष्टीवकर हे अधिवेशनाचे अध्यक्ष असतील. ज्येष्ठ पत्रकार मा. श्री. मधुकर भावे यांचे मार्गदर्शन पत्रकारांना लाभणार आहे.
१८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुलात अधिवेशनाचे उद्घाटन होईल. तत्पूर्वी उदगीर शहरातून प्रभात फेरी काढली जाणार असून त्यामध्ये शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी  सहभागी होतील. दुपारच्या सत्रात उदगीरमधून बाहेर पडून पत्रकारितेच्या क्षेत्रात देदीप्यमान यश मिळविणाऱ्या पत्रकारांचा सत्कार आणि त्यांच्या मनोगताचा कार्यक़म प्रा. जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली होईल.. दुपारी १० ते ५.३० या वेळेत लोकप्रतिनिधींच्या माध्यमांकडून अपेक्षा
या विषयावर आमदार रोहीत पवार यांची मुलाखत घेतली जाणार आहे. रात्री ७ वाजता 
लोककलेचा जागर हा मनोरंजनाचा कार्यक्रम होईल
१९ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष *सुनील तटकरे* याची मुलाखत होईल.. पुढारी न्यूज चे संपादक *प्रसन्न जोशी* ही मुलाखत घेतील.. सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत *माध्यमं सत्ताधाऱ्यांना झुकतं माप देताहेत का*? या विषयावरील परिसंवादात भाजप उपाध्यक्ष केशव उपाध्ये, कॉंग्रेसचे हनुमंत पवार, राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण, शिवसेनेचे राहूल लोंढे, उबाठाचे जयेश वाणी हे विविध राजकीय पक्षांचे प्रवक्ते सहभागी होतील.. पत्रकारांची बाजू मांडतील ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई..दुपारी १.३० ते ३ या वेळेत "*टीव्हीच्या पडद्यावरची दुनिया*" या विषयावरील चर्चेत प्रसन्न जोशी, विशाल परदेशी, प्रज्ञा पोवळे, श्वेता दांडेकर, सौरभ कोरटकर, विशाल पाटील सहभागी होत आपले अनुभव सांगतील. दुपारी ३ ते ५ या वेळात अधिवेशनाचा समारोप समारंभ होईल. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, जय महाराष्ट्रचे संपादक प्रसाद काथे आणि मुक्तपीठचे संपादक तुळशीदास भोईटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.. एस.एम.देशमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.. समारोप समारंभात लातूर जिल्ह्यातील काही मान्यवर पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे.
अधिवेशनास राज्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, डिजिटल मिडिया परिषदेचे प्रमुख अनिल वाघमारे, विभागीय सचिव तसेच अधिवेशन मुख्य संयोजक सचिन शिवशेट्टे, रवी उबाळे, मराठवाड्याचे उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, उदगीर तालुका मराठी पत्रकार परिषदेचे  अध्यक्ष युवराज धोतरे , लातूर जिल्हा डिजिटल मिडीयाचे अध्यक्ष बिभीषन मद्देवाड , पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे  निमंत्रक अर्जुन जाधव ,जिल्हा डिजिटल मिडीयाचे सचिव सिद्धार्थ सुर्यवंशी तसेच परिषदेचे सर्व उपाध्यक्ष, विभागीय सचिव आणि कार्यकारिणी सदस्यांनी य
केले आहे.

मंगळवार, १४ एप्रिल, २०२६

आमदार शंकर जगताप यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या शिलेदारांनी भीम अनुयायांची केली अन्न पाणी सेवा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मिडिया परिषदेच्या वतीने अन्न पाणी सेवा संपन्न 

पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मिडिया परिषदेच्या पत्रकारांनी अन्न पाणी वाटप करून भीम अनुयायांची केली सेवा

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १४ एप्रिल २०२६ : पिंपरी चिंचवड शहरात आज पिंपरी येथे महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर पिंपरी चौकात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांना आज दिनांक १४; एप्रिल पिंपरी चिंचवड पत्रकार संघ अध्यक्ष सागर गोपाळ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या अन्न पाणी वाटपात उपस्थित पत्रकारांनी भीम अनुयायांची सेवा केली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद राज्य उपाध्यक्ष गणेश मोकाशे तसेच डिजिटल मिडिया परिषदेचे शहर अध्यक्ष विनय सोनवणे यांनी आयोजनामध्ये मोलाचे योगदान दिले. अन्न पाणी सेवा सुरू असताना दरम्यान आमदार शंकर जगताप, माजी आमदार गौतम चाबुकस्वार , भाजप शहराध्यक्ष शत्रुग्न काटे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, शिवसेना नेते युवराज कोकाटे, कैलास कुटे, दीपक नागरगोजे यांच्यासह विविध पक्ष संघटना व सामाजिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मिडिया परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून भीम अनुयायांना अन्न व पाणी वाटप करून शुभेच्छा दिल्या.

दरवर्षी पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील भीम सृष्टी येथील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने भीम अनुयायी आणि नागरिक येत असतात. त्यांच्या अन्न पाण्याची आणि अल्पोपहराची सोय व्हावी या उद्देशाने पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मिडिया परिषदेच्या वतीने अन्नपाणी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी भीम अनुयायांसह उपस्थित पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावर दिसले. तत्पूर्वी विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पत्रकारांनी अभिवादन केले.

यावेळी आयोजक पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर गोपाळ सूर्यवंशी, डिजिटल मिडिया परिषद अध्यक्ष विनय सोनवणे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद राज्य उपाध्यक्ष गणेश मोकाशे यांच्यासह अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मिडिया परिषद पिंपरी चिंचवड चे सदस्य व पदाधिकारी तसेच प्रत्यक्ष सक्रीय पत्रकार महावीर जाधव, सिद्धांत चौधरी, संतोष गोतावळे, संभाजी बारबोले, रोहित जाधव, अशोक कोकणे, दत्ता कांबळे, नरेश जीवनाल, हनुमंत रामदासी, सीता जगताप इत्यादी पत्रकार उपस्थित होते. तसेच विविध संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

सोमवार, १३ एप्रिल, २०२६

पर्यावरणपूरक इमारतींसाठी महापालिकेची सामान्य करात ग्रीन सवलत


पर्यावरणपूरक इमारतींसाठी महापालिकेची सामान्य करात ग्रीन सवलत

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड : १३ एप्रिल २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत सामान्य करावर विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. कर आकारणी आणि कर संकलन विभागाच्या या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांना ‘पर्यावरणपूरक’ जीवनशैली अंगीकारण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

 कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया आणि झिरो वेस्ट संकल्पना प्रभावीपणे राबवणाऱ्या इमारतींना करात थेट सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संगोपन करताना नागरिकांना आर्थिक दिलासाही मिळणार आहे.

*अशा मिळणार सवलती* :

* ऑनसाइट कंपोस्टिंग यंत्रणा कार्यान्वित असल्यास – ५% सवलत

* ऑनसाइट कंपोस्टिंग एस.टी.पी प्लँट कार्यान्वित असल्यास ८% सवलत

* फक्त एस.टी.पी प्लँट कार्यान्वित असल्यास ३% सवलत

* झिरो वेस्ट संकल्पना राबविल्यास ८% सवलत

* झिरो वेस्ट तसेच एस.टी.पी प्लँट कार्यान्वित असल्यास १०% सवलत

महापालिकेच्या या निर्णयामुळे गृहनिर्माण संस्था आणि व्यावसायिक इमारतींना कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी पुनर्वापर करण्यास सोसायटीना प्रेरणा मिळणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका उप आयुक्त सचिन पवार म्हणाले, पर्यावरणपूरक उपाययोजना राबवणाऱ्या इमारतींना प्रोत्साहन देणे हा या सवलती मागील मुख्य उद्देश असून, नागरिकांनी ऑनसाइट कंपोस्टिंग, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एस.टी.पी) आणि झिरो वेस्ट संकल्पना स्वीकारल्यास शहरातील कचरा व्यवस्थापनास आणखी बळ मिळेल.

पिंपरी चिंचवड आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छ, हरित आणि शाश्वत बनविण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. कर सवलतींच्या माध्यमातून नागरिकांना पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा उभारण्यास प्रोत्साहन मिळेल आणि ‘ग्रीन सिटी’चा संकल्प अधिक बळकट होईल.

पर्यावरणपूरक सुविधा उभारणाऱ्या इमारतींना करात सवलत देण्याची ही योजना शहराला स्वच्छ, हरित आणि शाश्वत बनविण्याकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

नागरिकांनी या सवलतींचा लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या यंत्रणा उभाराव्यात आणि पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

एमआयडीसी परिसरातील नाल्यांच्या स्थितीचा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आढावा


संयुक्त पाहणीद्वारे बुजविलेले व अतिक्रमित नाले ओळखून आवश्यक उपाययोजना करण्याचे दिले निर्देश

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १३ एप्रिल २०२६ : एमआयडीसी परिसरातील नाल्यांवर झालेले अतिक्रमण आणि बुजविण्याच्या प्रकारांमुळे नैसर्गिक जलप्रवाह बाधित होत असून पावसाळ्यात पाणी साचण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे एमआयडीसी व महापालिका अधिकारी आणि संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत संयुक्त पाहणी करून अतिक्रमित व बुजविलेले नाले तात्काळ ओळखून आवश्यक ती कार्यवाही करावी. ज्या ठिकाणी शक्य आहे तेथे नाल्यांची मूळ रचना पुनर्स्थापित करावी किंवा पर्यायी व्यवस्था करावी, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरातील नाल्यांची सद्यस्थिती, त्यावरील अतिक्रमणे तसेच पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्यांचा सखोल आढावा घेण्यासाठी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात महत्त्वपूर्ण बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. 

या बैठकीस एमआयडीसीच्या विभागीय अधिकारी अर्चना पठारे, उप आयुक्त अण्णा बोदडे, प्रदीप ठेंगल, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय कोतावाड, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, अजिंक्य येळे, अतुल पाटील, पूजा दुधनाळे, निवेदिता घार्गे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान एमआयडीसी परिसरातील जलनिस्सारण व्यवस्थेचे सध्याचे स्वरूप, अडथळे आणि त्यावरील उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, शहरातील एमआयडीसी परिसरात जुन्या नकाशांमध्ये दर्शविलेले अनेक नाले कंपन्यांकडून बुजविण्यात आले आहेत किंवा त्यावर अतिक्रमण करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले आहे. या अतिक्रमणांमुळे नैसर्गिक जलप्रवाह अडथळित होत असून, पावसाळ्यात पाणी साचणे, पूरस्थिती निर्माण होणे आणि उद्योग तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. 

या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांना एमआयडीसी आणि संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत संयुक्त पाहणी करून एमआयडीसी परिसरातील बुजविलेले किंवा अतिक्रमित नाले तसेच पाणी साचणारी ठिकाणे तात्काळ ओळखून त्यांची नोंद घेण्यात यावी. शिवाय, जुन्या नाल्यांची मूळ रचना पुनर्स्थापित करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीची कामे हाती घेणे गरजेचे असून, ज्या ठिकाणी ते शक्य नाही तेथे पर्यायी स्वरूपात स्टॉर्म वॉटर लाईन टाकण्याची कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी नमूद केले.

तसेच, जलनिस्सारण मार्गांवर अतिक्रमण करणे ही गंभीर बाब असून यामुळे संपूर्ण परिसराच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. नाल्यांवर अतिक्रमण केलेल्या किंवा नाले बुजविलेल्या कंपन्यांनी अतिक्रमण काढून नाले पूर्वस्थितीत आणण्याबाबत कळविण्यात यावे. तसेच आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील जलनिस्सारण व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आणि वेळेत काम करण्याचे निर्देशही आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी दिले.

धक्कादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये एवढ्या शाळा अनधिकृत; पालकांना प्रवेश न घेण्याचे आवाहन


पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर ! पालकांची चिंता वाढली!

अखेर शिक्षण विभागाला आली जाग ! अनधिकृत असलेल्या शिक्षण संस्था शाळांवर कारवाई केली जाईल अशी नोटीस 

| सांगावा न्यूज | पिंपरी-चिंचवड, दिनांक १३ मार्च २०२६ : शहरातील १५ शाळा अनधिकृत असल्याचे समोर आल्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) शिक्षण विभागाने पालकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. संबंधित शाळांमध्ये या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये, अशी स्पष्ट सूचना देत शिक्षण विभागाने अधिकृत नोटीस काढून अनधिकृत शाळांची यादीही जाहीर केली आहे. महापालिकेच्या माहितीनुसार, या शाळा मागील अनेक वर्षांपासून सुरू होत्या. मात्र आवश्यक परवानग्या, मान्यता व शैक्षणिक निकष पूर्ण न केल्यामुळे त्या अनधिकृत असल्याचे यंदा स्पष्ट झाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चिंता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

शिक्षण विभागाने पालकांना आवाहन केले आहे की, आपल्या पाल्यांच्या प्रवेशापूर्वी संबंधित शाळेची मान्यता तपासून घ्यावी. तसेच अधिकृत मान्यता नसलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास भविष्यातील शैक्षणिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून या अनधिकृत शाळांवर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. शहरातील शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि गुणवत्ता राखण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील अनाधिकृत खाजगी प्राथमिक शाळांविरोधात मोठी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला असून, या विषयावर सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या महाराष्ट्र लोकधारा न्यूजचे संपादक महावीर जाधव यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षात अनेक खाजगी प्राथमिक शाळा शासनाची आवश्यक परवानगी न घेता अनधिकृतरित्या सुरू असल्याचे उघड झाले आहे. यापूर्वी संबंधित शाळांना प्रशासनामार्फत नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही या शाळा सुरूच ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

अनधिकृत शाळांची यादी पुढीलप्रमाणे:
ब्लोमिंग बर्ड्स, ताथवडे (इंग्रजी माध्यम)
लिटील स्टार इंग्लिश मिडीयम, चिंचवडेनगर (इंग्रजी माध्यम)
माऊंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल, कासारवाडी (इंग्रजी माध्यम)
डी.एम.के. इंटरनॅशनल स्कूल, कासारवाडी (इंग्रजी माध्यम)
माने इंग्लिश मिडीयम स्कूल, काळेवाडी (इंग्रजी माध्यम)
नर्चर इंटरनॅशनल स्कूल, काळेवाडी/च-होळी परिसर (इंग्रजी माध्यम)
माईंडवर्ल्ड इंटरनॅशनल स्कूल, च-होळी परिसर (इंग्रजी माध्यम)
हेम्स इंटरनॅशनल स्कूल, वाकड (इंग्रजी माध्यम)
कॅटलिस्ट इंटरनॅशनल स्कूल, च-होळी फाटा (इंग्रजी माध्यम)
गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल, मोशी (इंग्रजी माध्यम)
या प्रकरणामुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पत्रकार महावीर जाधव यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा मुद्दा ऐरणीवर आला असून, प्रशासनाला कारवाईस भाग पाडले असल्याची चर्चा सुरू आहे.

उदगीर अधिवेशनाची जय्यत तयारी : उदगीरात अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशन सभामंडप कामाचे भूमिपूजन

| सांगावा न्यूज | उदगीर, दिनांक १३ : येत्या दि. १८ व १९ एप्रिल रोजी उदगीर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या ४४ व्या अधिवेशनासाठी उभारण्यात येणाऱ्या सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. 

     उदगीर येथील स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुलात हे अधिवेशन पार पडणार आहे. दोन दिवशीय अधिवेशनात अनेक विषयावर परिसंवाद होणार आहेत. महाराष्ट्रभरातून अनेक नामवंत पत्रकार व युवा राजकीय नेते या परिसंवादात सहभागी होणार आहेत. या अधिवेशनासाठी स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुलात भव्य दिव्य असे सभामंडप उभारण्यात येत आहे. 

यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी कोषाध्यक्ष विजय जोशी, परिषदेचे विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे, उदगीर शाखेचे अध्यक्ष युवराज धोतरे, अधिवेशन समन्वयक ज्योती स्वामी, डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड, ज्येष्ठ पत्रकार व्ही. एस. कुलकर्णी, सुनील हवा, रविंद्र हसरगुंडे, सिद्धार्थ सूर्यवंशी, हणमंत केंद्रे, नागनाथ गुटे, रसूल पठाण, रामदास केदार, संदीप निडवदे, अर्जुन जाधव, अनिल जाधव, विक्रम हलकीकर, विश्वनाथ गायकवाड, माधव रोडगे, मंगेश सूर्यवंशी यांच्यासह पत्रकार, स्वामी विवेकानंद संस्थेतील कर्मचारी उपस्थित होते.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय संबंधांवरील विचार आजही दिशा देणारे __ तज्ज्ञांचे मत


विचार प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत परिसंवादात परदेशातील शिक्षण व रोजगार संधींबाबत मार्गदर्शन

| सांगावा न्यूज | पिंपरी, दि. १३ एप्रिल २०२६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय संबंधांवरील विचार आजही आधुनिक भारताच्या परराष्ट्र धोरणाला दिशा देणारे ठरत असून, जागतिकीकरणाच्या युगात शिक्षण व रोजगाराच्या नव्या संधी शोधताना त्यांच्या दूरदृष्टीची प्रासंगिकता अधिक ठळकपणे जाणवते. सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक समतेचा आग्रह धरणाऱ्या त्यांच्या विचारसरणीमुळे भारतीय युवकांनी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होण्यासाठी व्यापक दृष्टीकोन स्वीकारणे आवश्यक आहे, असे मत ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय संबंधांवरील विचार आणि सद्यस्थिती तसेच परदेशातील शिक्षण व रोजगार संधी’ या विषयावर आयोजित परिसंवादात तज्ज्ञांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘विचार प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय संबंधांवरील विचार आणि सद्यस्थिती तसेच परदेशातील शिक्षण व रोजगार संधी’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

या परिसंवादात परदेशातून नंदू मोरे (बेल्जियम), डॉ. शैलेश कोळेकर (डेन्मार्क), रेवा रॉय (कॅनडा), विरेंद्र घुटके (स्वीडन), धम्मचारी सुदिप्ता (इंग्लंड) यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे सहभाग घेतला तर प्रा. डॉ. संजय खोब्रागडे (नागपूर), प्रा. केशव वाघमारे (संशोधक), प्रा. डॉ. अशोक गायकवाड (प्राचार्य, कला, वाणिज्य, बी.बी.ए. महाविद्यालय, वडगाव मावळ), प्रा. डॉ. नितीश नवसागरे (विधी महाविद्यालय, पुणे), प्रा. रोनके राम (पंजाब विद्यापीठ), प्रा. विवेक कुमार (जेएनयू, दिल्ली) हे देखील उपस्थित होते. यावेळी महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड उपस्थित होते.

परदेशातील शिक्षण व रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करताना नंदू मोरे यांनी जागतिक स्तरावर बदलत असलेल्या कौशल्यांच्या गरजेवर भर दिला. प्रोग्राम मॅनेजमेंट, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), अॅनिमेशन, डेटा सायन्स आणि डेटा ऑटोमेशन या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. यासोबतच उत्तम संवादकौशल्य (कम्युनिकेशन स्किल्स) हे जागतिक पातळीवर यश मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कॅनडामधील रोजगाराच्या संधींबाबत माहिती देताना रेवा रॉय यांनी नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करण्याची गरज अधोरेखित केली. वेगाने बदलणाऱ्या जागतिक रोजगार बाजारात टिकून राहण्यासाठी सतत अद्ययावत राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कौशल्यविकास आणि तांत्रिक प्रावीण्य यांच्या आधारे भारतीय युवकांसाठी परदेशात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इंग्लंडमध्ये शिक्षण घेताना आलेल्या अनुभवांचे कथन करताना धम्मचारी सुदिप्ता यांनी परदेशातील शैक्षणिक प्रवासातील आव्हाने मांडली. वंचित समाजाच्या प्रश्नांना जागतिक स्तरावर मांडण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळे अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच परदेशातही बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, असे त्यांनी नमूद केले.

युरोपियन देशांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजनांबाबत विरेंद्र घुटके यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक देशातील रोजगाराच्या संधी समजून घेताना स्थानिक भाषा शिकणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षणादरम्यान इंटर्नशिप करण्याचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून कौशल्यविकासाला चालना मिळते, असे स्पष्ट केले.

प्रा. डॉ. संजय खोब्रागडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनाचा विचार करता भारताच्या परराष्ट्र धोरणात समता व न्याय या मूल्यांना विशेष स्थान मिळाले आहे. जागतिक स्तरावर सामाजिक न्यायाचा विचार अधिक प्रभावीपणे मांडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचा अभ्यास करताना जागतिक घडामोडींकडे चिकित्सक दृष्टीकोनातून पाहणे आवश्यक असल्याचे प्रा. केशव वाघमारे यांनी सांगितले. संशोधनाच्या माध्यमातून भारतीय युवकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करावी, असे त्यांनी आवाहन केले.

प्रा. डॉ. अशोक गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणासोबतच जागतिक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे असल्याचे सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन शिक्षणाचा उपयोग समाज परिवर्तनासाठी करावा, असे त्यांनी अधोरेखित केले.

प्रा. डॉ. नितीश नवसागरे यांनी आंतरराष्ट्रीय कायदा आणि मानवाधिकारांच्या दृष्टीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही मार्गदर्शक ठरतात, असे मत मांडले. विद्यार्थ्यांनी विधी क्षेत्रात जागतिक संधींचा अभ्यास करून स्वतःला सक्षम करावे, असेही त्यांनी सांगितले.

जागतिक पातळीवर सामाजिक विषमता कमी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आवश्यकता असल्याचे प्रा. रोनके राम यांनी नमूद केले. आंतरराष्ट्रीय मंचांवर वंचित घटकांचे प्रश्न मांडण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.

युरोपमधील शिक्षण व संशोधनाच्या संधींबाबत माहिती देताना डॉ. शैलेश कोळेकर यांनी कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. परदेशात यश मिळवण्यासाठी शिस्त, सातत्य आणि जागतिक दृष्टीकोन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

केशव वाघमारे यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ देत १९२७ मध्ये झालेल्या महाड सत्याग्रहातील त्यांच्या ऐतिहासिक भूमिकेचा उल्लेख केला. या सत्याग्रहातील भाषणात बाबासाहेबांनी समतेच्या लढ्याची तुलना फ्रान्समधील वर्साय येथील समतेच्या चळवळीशी केली होती, असे त्यांनी सांगितले. तसेच लोकशाही मूल्यांना प्राधान्य देणाऱ्या देशांशी संबंध प्रस्थापित करण्याची बाबासाहेबांची ठाम भूमिका होती, असे नमूद करत त्यांनी आंबेडकरी विचारांची जागतिक दृष्टी स्पष्ट केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त अण्णा बोदडे यांनी केले.


गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या गझलांनी रसिक मंत्रमुग्ध

विचार प्रबोधन पर्वात दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या सत्रात गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या गझलांचे सादरीकरणाने झाले. त्यांच्या सुरेल आणि भावपूर्ण गायकीने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. गझलांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक जाणिवा आणि मानवी मूल्यांचा वेध घेतला. यानंतर सुप्रसिद्ध गायक रवींद्र खोमणे, अमोल यादव, सोमनाथ फटाके व सहकाऱ्यांनी ‘भीम उत्सव’ अंतर्गत महामानवांच्या विचारांना वंदन करणारी प्रेरणादायी गीते सादर केली. या गीतांमधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत समता, बंधुता आणि न्याय यांचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमात संगीत, विचार आणि समाजप्रबोधन यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला. उपस्थितांनी कलाकारांच्या सादरीकरणाला टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

प्रबोधन पर्वात मंगळवार, १४ एप्रिल २०२६ रोजी होणारे कार्यक्रम

सकाळी ६ वाजता : महामानवांना संगीतमय अभिवादन - संतूर आणि सितार वादनाची जुगलबंदी (सादरकर्त्या- वहाने सिस्टर्स, उज्जैन, मध्यप्रदेश) 

सकाळी ८ वाजता : युगपुरूष (गीत गायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम, सादरकर्ते – सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक नागसेन सावदेकर आणि कुणाल वराळे )

सकाळी ९ वाजता : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन (हस्ते – महापौर रवि लांडगे, स्थळ – मनपा भवन)

सकाळी ९.१५ वाजता : क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पिंपरी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

सकाळी ९.३० वाजता : वंदना व समता सैनिक दलाची मानवंदना (संयोजन – भारतीय बौद्ध महासभा)

सकाळी ९.३० वाजता : नृत्य कला फ्लॅश मॉब (सादरकर्ते - दिया बनसोडे आणि सहकारी )

सकाळी ९.३० वाजता : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी एच.ए.कॉलनी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन 

सकाळी ९.४५ वाजता : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दापोडी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन 

सकाळी १० वाजता : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पिंपरी येथील पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी (आयोजक – एकता कर्मचारी संघटना)

सकाळी १०.३० वाजता : तारपावादक पद्मश्री भिकल्या धिंडा आणि सहकारी यांच्या वतीने महामानवांना आदिवासी कलाविष्कारातून अभिवादन (सादरकर्ते – तारपा आदिवासी नृत्य पथक, वाळवंडा, ता. जव्हार, जि. पालघर)

सकाळी ११ वाजता : सांस्कृतिक शाहिरी जलशाचा कार्यक्रम शाहिरी भीमगर्जना (सादरकर्ते – युवा शाहीर गंधर्व पृथ्वीराज देवानंद माळी सांगलीकर आणि सहकारी)

दुपारी १२.३० वाजता : आंबेडकरी चळवळीतील गायकांचा जीवनपट साकारणारा संगीतमय कार्यक्रम (सादरकर्ते - सुप्रसिद्ध गायक संदेश विठ्ठल उमप, प्रविण डोणे, कडूबाई खरात, अमोल घोडके, ओमकार घाडगे आणि सहकारी)

दुपारी २ वाजता : गीत गायन (सादरकर्ते –चंद्रकांत शिंदे, गायत्री शेलार, राधा खुडे, चित्रसेन भवार)

दुपारी ४ वाजता : प्रबोधनात्मक किर्तनाचा कार्यक्रम (सादरकर्ते - प्रबोधनकार सप्तखंजिरी वादक डॉ. रामपाल धारकर, अमरावती)

सायंकाळी ५.३० वाजता : गीत गायन (सादरकर्ते -अजय देहाडे आणि सारेगमप फेम विनोद गोडबोले)

सायंकाळी ७.३० वाजता : ट्रीब्युट टू महात्मा फुले ऍन्ड डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑन व्हील्स (महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नृत्य संगीतातून अनोखे अभिवादन, सादरकर्ते – राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ. सय्यद पाशा आणि भारतातील नामवंत दिव्यांग कलाकार)

रात्री ९.३० वाजता : शौर्यगाथा महामानवांची (लोककलेवर आधारित ४० कलाकारांनी सजलेला पारंपरिक वाद्यवृंदाचा संगीतमय अविष्कार, सादरकर्ते - शेखर नवतरे आणि सहकारी)

‘आशादीप’ विझला; स्वरांचा सूर्य अनंतात विलीन — आमदार अमित गोरखे, (संस्थापक अध्यक्ष कलारंग संस्था)


| सांगावा न्यूज | पिंपरी-चिंचवड, दिनांक १२एप्रिल २०२६ : भारतीय संगीतविश्वातील अजरामर स्वरांचा एक दिव्य अध्याय आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. अष्टपैलू, बहुरंगी आणि भावस्पर्शी गायिका आशा भोसले यांच्या निधनाने कला, संस्कृती आणि संगीताच्या विश्वावर एक गहिरे दुःखाचे सावट पसरले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेत, वयाच्या ९२ व्या वर्षी अनंतात विलीन होण्याचा प्रवास पूर्ण केला. त्यांच्या जाण्याने जणू संगीताचा ‘आशादीप’ विझला आहे; परंतु त्यांच्या स्वरांची ज्योत ही काळाच्या प्रत्येक पडद्यावर तेजोमय राहणार आहे. अशा भावना आमदार अमित गोरखे (संस्थापक अध्यक्ष कलारंग संस्था) यांनी व्यक्त केल्या.

आमदार अमित गोरखे, भावपूर्ण शब्दांत आपल्या भावना व्यक्त करताना म्हणले की,"आशा भोसले म्हणजे केवळ एक गायिका नव्हत्या, तर त्या भारतीय संगीतसंस्कृतीचा एक जिवंत वारसा होत्या. त्यांच्या स्वरांनी प्रेम, वेदना, आनंद आणि जीवनाचा उत्सव यांना अद्वितीय अभिव्यक्ती दिली. त्यांच्या जाण्याने ‘आशा’चा दीप जरी मालवला असला, तरी त्या स्वरांची प्रभा अनंत काळापर्यंत पिढ्यांना प्रेरणा देत राहील. संगीताच्या प्रत्येक सूरामध्ये त्यांनी जिवंतपणा आणला. त्यांच्या कलेतून भारतीय संस्कृतीचे वैभव जगभर पोहोचले. आज आपण एका युगाचा अंत अनुभवत आहोत; ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.आशा भोसले यांच्या स्वरांनी केवळ गाणी नाही, तर अनेकांच्या आयुष्यातील भावना, आठवणी आणि क्षणांना स्वरबद्ध केले. त्या स्वरांचे साम्राज्य आजही प्रत्येक रसिकाच्या मनात अजरामर आहे"
स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांना कलारंग संस्था यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. त्यांच्या अमर स्वरांना कोटी कोटी प्रणाम.